दि. २८ जानेवारी ते दि. १ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत हल्द्वानी, नैनिताल, उत्तराखंड येथे पार पडलेल्या ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाने निर्विवाद अजिंक्यपद मिळविले.

पुरुष संघाचा कर्णधार होता ठाण्याचा श्री. गजानन शेंगाळ तर महिला संघाची कर्णधार होती धाराशिवची कु. संपदा मोरे.